लोकसभेला सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करणं चूक होतं – अजित पवार
बारामतीमधून सात आठ वेळा निवडणू आलो आहे. त्यामुळे आता तिथून लढणयात रस नाही – अजित पवार
पुन्हा शरद पवार यांच्याशी हातमिळवणी करणार का ? यावर अजित पवारांचं नो कॉमेंट
अजित पवारांची गेल्या तीन चार दिवसातील ही स्टेटमेंट बरच काही सांगून जात आहेत. पहिलं वक्तव्य त्यांनी एका चॅनला दिलेल्या मुलाखतीमधलं आहे. बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभं केलं. अजित दादांचा दरारा, कार्यकर्त्यांचं मोठं जाळं, मोठी आर्थिक रसद, भाजपचा पाठिंबा, राज्यातील आणि केंद्रातील सत्तेचं बळ. असं असूनही बारामतीमधून गेल्यावेळेपेक्षा जास्त मतांनी सुप्रिया सुळे जिंकल्या. शेवटच्या टप्प्यात खडकवासला मतदारसंघात आणि एकूणच लोकसभा मतदारसंघात भाजपनं संघाच्या मतदीनं पूर्ण ताकद लावली. तरीही अजित दादांना मोठा पराभव स्विकारावा लागला. सर्व काही असताना असं का झालं ?
त्याचं दुसरं वक्तव्य म्हणज्ये बारातमतीमधून यापूर्वी अनेक वेळा जिंकलोय. त्यामुळे आता तिथून लढण्यात रस नाही. त्यानंतर लगेच प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांची त्यावर प्रतिक्रिया येते अजित दादा आमचे कॅप्टन आहेत. बारामतीतूनच लढतील. तिथली जनता त्यांना सोडणार नाही. असं एकदम काय झालं की अजित दादांना आता बारामतीमधून लढण्यात रस राहिला नाही. यापूर्वी ते असं कधीही बोलल्याचं समोर आलं नाही. त्यामुळे नक्कीच याही वक्तव्याचा काहीतर अर्थ आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला अजित दादांनी खास मुलाखत दिली आहे. यापूर्वी कधी अजित दादांची एएनआयला मुलाखत आल्याचं आठवत नाही. त्या मुलाखतीमध्ये अजित दादांना तुम्ही पुन्हा शरद पवार यांच्योबत जाणार का असा प्रश्न केला. त्यावर दादांचं उत्तर नो कॉमेंट. याचा काय अर्थ घ्यायचा. ते पुन्हा शरद पवारांकडे जाणार का ? त्यांनी महायुतीत असताना आता पुन्हा पवारांसोबत जाणार नाही असं स्पष्टपणे का सांगितलं नाही ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात.
अजित दादांच्या या तीन वक्तव्याचा बारकाईने विचार केला तर त्याचा अर्थ एकच निघतो. लोकसभेला सर्वकाही करुन पाहिलं पण मतदार काही आपल्यासोबत आले नाहीत. कार्यकर्ते सोबत असूनही मतदार सोबत आले नाहीत. राष्ट्रवादीच्या मतदारांनी शरद पवारोंबतच राहणं पसंतं केलं. सगळी सहानभुती ही शरद पवारांसोबत होती. आता ती सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न अजित दादा करत आहेत. त्याच स्ट्रॅटर्जीचा एक भाग म्हणून या व्यक्तव्याकडं पाहवं लागेलं. या पुढेही अशी वक्तव्य येऊ शकतात.
लाडकी बहिण योजनेचं श्रेय घेण्यासाठी अजित दादांनी गुलाबी रंग असलेले जॅकेट वापरायला सुरूवात केली आहे. त्यांच्या जनसन्मान यात्रेतील बसेसचा रंगही गुलाबी आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रय़त्न या यात्रेतून केला जात आहे. याचा किती फायदा त्यांना होईल हे निवडणुकीनंतरह कळेल. पण राष्ट्रवादीचा प्रमुख मतदार म्हणज्ये भाजप किंवा संघ विचाराच्या विरोधात असलेला मराठा मतदार, काही प्रमाणात ओबीसी, दलित आणि मुस्लिम हे राष्ट्रवादीचा मतदार आहे. अजित दादा भाजपसोब गेल्यामुळे हा मतदार काही केल्या त्यांच्यासोबत येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भाजपच्या आणि महायुतीच्या मतदारांवर त्यांना आता विसंबून राहवं लागले अशी स्थिती आहे. बघूयात काय होतं ते ?

COMMENTS